मुंबई: भाजपाचे केंद्रीयमंत्र रावसाहेब दानवे कायदा तोडण्याचा सल्ला देत असून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली आहे.

केंदीय मंत्री रावसाहेब दानवे हे कायदा तोडण्याचा सल्ला आणि प्रोत्साहन देवून लोकांच्या भावनेशी खेळत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या मंत्र्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि अटक करावी असेही नवाब मलिक म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये लक्ष घालून अशाप्रकारचे मंत्री आहेत त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

एका बाजूला गोहत्येच्या नावावर मुस्लिम समाजाच्या विरोधात मॉबलिचिंगचे प्रकार घडत आहेत. दुसरीकडे मतांसाठी गोहत्या करा असं मुस्लिम समाजाच्या लोकांना सांगायचं असे मंत्री केंद्रात असतील तर देशात काय सुरु आहे हे लक्षात येते असेही नवाब मलिक यांनी सांगितले.                                                                                                                                                                                          

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: