दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा विजय झाला आहे. दिल्लीत या विजयासह आपने विजयाची हॅट्रिक पूर्ण केली आहे. या निवडणुकीत भाजपचे अवघ्या काही उमेदवारांचाच विजय झाला आहे. दरम्यान मंत्री जयंत पाटील यांनी दिल्ली निकालांच्या निमित्ताने भाजपवर टीका केली आहे.

 

या दिल्ली विधानसभा निवडणुकींच्या माध्यमातून भाजपचा बुडबुडा  फुटला आहे. भाजपप्रती असलेला विरोध दिल्लीकरांनी मतदानातून प्रकट केला आहे. भाजपच्या लोकप्रियतेची लाट ओसरल्याच मंत्री जयंत पाटील म्हणाले आहेत. त्यांनी याबद्दल एक ट्विट केलं आहे.

 

केजरीवाल दिल्लीचा विकास करताना भाजप अडथळे निर्माण करत होती, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच यासर्व परिस्थितीचा दिल्लीकरांनी समाचार घेतला. केजरीवाल यांच्या बाजूने लोकांनी मतदान केले यातच नरेंद्र मोदी यांचा पराभव झाल्याचं जयंत पाटील म्हणाले. दिल्लीत आम आदमी पार्टीला ६३ तर भाजपचा ७ जागांवर विजय झाला आहे. दरम्यान काँग्रेसला यंदाही भोपळा फोडण्यास अपयश आले आहे.                                                                                                                            

 

https://twitter.com/Jayant_R_Patil/status/1227200566838718466?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1227200566838718466&ref_url=https%3A%2F%2Fwww.jaimaharashtranews.com%2Fmaharashatra-ncp-minister-jayant-patil-criticized-bjp%2F

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: