नवी दिल्ली – माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला आतापर्यंतचा देशाचा सर्वश्रेष्ठ कर्णधार असे भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने म्हटले आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात भारताचा मर्यादित षटकांचा उपकर्णधार रोहितने हजेरी लावली. त्याने या कार्यक्रमात धोनीबद्दल आपली प्रतिक्रिया दिली.

 

धोनी हा एक शांत क्रिकेटपटू असून त्याला मैदानावर या स्वभावामुळे चांगले निर्णय घेण्यात मदत झाली. तो आयसीसीच्या तिन्ही स्पर्धांचा विजेता आहे, त्याचबरोबर आयपीएलमध्येही त्याने अनेकवेळा विजेतेपदे जिंकली आहेत. भारताचा तो सर्वोत्कृष्ट कर्णधार आहे. तो त्याचा शांत स्वभाव तणाव आणि दबावाच्यावेळी जपतो, असे रोहित म्हणाला. धोनी दबावाच्या वेळी अनेक युवा गोलंदाजांना सांभाळून घेताना मी पाहिले आहे. या गोष्टीमुळे जेव्हा अनुभवी खेळाडू अशी वागणूक देतात तेव्हा युवा खेळाडूंचा विश्वास वाढतो, असेही रोहित म्हणाला.

 

टी-२० मालिकेत न्यूझीलंडला गारद केल्यानंतर, आता एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज झाला आहे. आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली. तत्पूर्वी, भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा दुखापतीमुळे एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: